कळंबोली शहरातील प्रश्नाबाबत श्री गिरीश धुमाळ यांनी मा. खासदार श्री श्रीरंग अप्पा बारणे साहेब यांना दिले निवेदन
पनवेल /प्रतिनिधी:जिल्हा प्रमुख श्री शिरीष घरत साहेब व महानगर प्रमुख श्री रामदास शेवाळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि विधानसभा समन्वयक श्री प्रदीपशेठ ठाकूर साहेब व डी एन मिश्राजी कळंबोली शहर प्रमुख यांच्या मार्गदर्शनाने कळंबोली वसाहतीत आज मितीस जवळपास दोन ते अडीज लाख लोकसंख्या वास्तव्य करत असून,आपल्या सद्य स्थितीत देशात निर्माण झालेल्या कोरोना संसर्ग काळात देखील शिवसेना पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या मेहनतीने कोरोना रुग्णांना लागणारी सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली. मात्र या काळात रुग्णांची रुग्नालयातुन ने-आण करण्यासाठी लागणाऱ्या *रुग्णवाहिकेचा* तुटवडा जाणवल्याने तसेच अनेक ठिकाणी रुग्णवाहिका चालकांनी रूग्णांच्या नातेवाईकांची अडवणूक व लुबाडणूक केल्याचे ऐकिवात आल्याने कळंबोली सारख्या मोठी लोकसंख्या वास्तव्यास असलेल्या वसाहतीत रुग्णांच्या मदती करिता शिवसेना पक्ष कार्यालयाकडे आपली स्वतःची रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यास रुग्णांची चांगल्या रिते मदत करता येईल. या साठी आज दिनांक २३/०८/२०२१ रोजी, *कळंबोली शहर समन्वयक श्री गिरीश धुमाळ यांनी मा. खासदार श्री श्रीरंग अप्पा बारणे साहेब यांना निवेदन देऊन, खासदार निधीतून कळंबोली पक्ष कार्यालयाला सुसज्ज अशी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्या करिता विनंती केली, तसेंच *मा खासदार श्री श्रीरंग बारणे साहेब* यांनी लवकरात लवकर रुग्णवाहिका उप्लब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यावेळीं *उपशहर प्रमुख श्री नारायण फडतरे, उपविभाग प्रमुख, श्री बापू ढेंबरे, उपशहर प्रमुख श्री सूर्यकांत म्हसकर, विभाग प्रमुख आकाश विलास शेलार, विभाग संघटक आशुतोष शेंडगे, उपविभाग संघटक विकास मिश्रा उपस्तिथ होते.*