कृषी कायदे रद्द.काँग्रेस तर्फे शेतकऱ्यांना श्रद्धांजली.
उरण दि 21(विठ्ठल ममताबादे )
केंद्रातील भाजपा सरकारकडून काल शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन काळे कृषीविषयक कायदे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा व खासदार राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने केंद्रातील विरोधी पक्षाने दिलेल्या लढ्याचा ऐतिहासिक विजय आहे. हा विजय या देशातील शेतकरी अन्नदात्यांच्या व त्यांनी केलेल्या वर्षभराच्या त्यागाचा विजय आहे. केंद्रातील अहंकारी सरकारला झुकवून हे तीन कृषी कायदे मागे घेण्यास शेतकऱ्यांनी भाग पाडले.दि. 20/11/2021 रोजी उरण कांग्रेस भवन येथे रायगड जिल्हा कॉंग्रेस चे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी उरण काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेऊन देशातील तीन काळे कृषी कायदे रद्द होण्यासाठी ज्या 700 शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले त्या शहिद शेतकऱ्यांना सर्व प्रथम श्रद्धांजली वाहिली.रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, मिलिंद पाडगावकर,अखलाख शिलोत्री, मार्तड नाखवा,कमळाकर घरत ,उरण तालुका काँग्रेस महिला अध्यक्षा रेखा घरत, उपाध्यक्षा संध्याताई ठाकुर, अफशा मुक्री,लंकेश ठाकुर,हितेन घरत, सदानंद पाटील, टेंबे काका, सुनील काटे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.